loader image
[ays_poll id=7]

मराठवाड्याला आमचा विकास अजून दिसायचा आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Sep 17, 2021


 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यात मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केल्यानंतर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली. तसंच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यासाठी योजनांचा पाढा वाचवून दाखवत मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले, त्यांना मला सांगायचं आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे, आणि अजून खूप होणार आहे. बोलघेवडे सरकार काही कामाचं नसतं, अशा कानपिचक्याही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावल्या.

– मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा
– निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार
– औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं मुख्यमंत्र्यांचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
– औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
– मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
– घृष्णेश्वर सभामंडप
– औरंगाबादचे पर्यटन समृद्ध करणार
– परभणीत शासकीय महाविद्यालय

उद्धव ठाकरे सकाळी 7.30 वाजता मुंबईहून विमानाने औरंगाबादकडे रवाना झाले. सकाळी 8.25 वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळ आगमन झालं. सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सकाळी 10.40 वाजता शेंद्रा येथील ऑरिक सिटी आणि डीएमआयसी अंतर्गतच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ते चिकलठाणा विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील विमानतळ, बाबा पेट्रोलपंप, सिद्धार्थ उद्यान, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आदी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. या दिवशी विविध राजकीय पक्षही आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलीस दलानेही काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेतलेली आहे.

दो गज की दूरी…मास्क है जरूरी

EP मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन करतील. सकाळी 9.25 वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कार्यक्रम स्थळी 400 च्या जवळपास खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या किंवा आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच या कार्यक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. वीस हजार चौरस फुटाच्या मंडपाची उभारणी केली असली तरी 200 लोकांनाच कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार – माजी आमदार राजाभाऊ देशमुख व अल्ताफ बाबा खान यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

नांदगाव तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार – माजी आमदार राजाभाऊ देशमुख व अल्ताफ बाबा खान यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

माजी आमदार राजेंद्र देशमुख तसेच अल्ताफ बाबा खान यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे...

read more
बघा व्हिडिओ – महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात १२ जण ठार

बघा व्हिडिओ – महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात १२ जण ठार

शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी ट्रकने अनेक...

read more
नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दि 30-06-2023 शनिवारी नाशिक रोड स्टेशनला स्लीपिंग...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड इ.१२ वी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ निकाल विज्ञान शाखा 99.21℅ व कला(उर्दू) शाखा 95.83 %

एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड इ.१२ वी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ निकाल विज्ञान शाखा 99.21℅ व कला(उर्दू) शाखा 95.83 %

मनमाड:- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,नाशिक विभागीय मंडळ नाशिक अंतर्गत फेब्रुवारी / मार्च -...

read more
.