आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे, भारताचे शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात एकाच दिवशी २ कोटी नागरिकांना कोविडचे लसीकरण करण्यात आले.
आज पर्यंत एकाच दिवसात सर्वात जास्त लसीकरण करण्याचा विश्वविक्रम चायनाच्या नावे आहे, त्यांनी एका दिवसात २.४७ कोटी नागरीकांचे लसीकरण केले आहे. सदर विश्वविक्रम मोडून काढण्यासाठी भारत सरकारतर्फे २.५० कोटी नागरिकांचे लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती, त्यात २ कोटी नागरिकांनाच एका दिवशी लसीकरण करण्यात आले.
एकूण झालेल्या २,११,२८,७८४ लसिकरणापैकी बिहार राज्यात १६.२८,०००, कर्नाटक १५.४७,०००, मध्य प्रदेश १३,०९,०००, उत्तर प्रदेश १२,१२,००० आणि गुजरात ११,३५,००० हे सर्वात जास्त लसीकरण करणारे राज्य ठरलेत. भारताने ८५ दिवसात १० कोटी नागरिकांना लसीकरण केले आहे, पुढील २० कोटीचा टप्पा गाठण्यासाठी ४५ तर ३० कोटीचा टप्पा गाठण्यासाठी २९ दिवसांचा कालावधी लागला आहे आणि १३ सप्टेबर रोजी भारताने ७५ कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.









