शिवसेना जर भाजप सोबत येण्याचा विचार करत असेल तर भाजप नक्कीच याचा विचार करेल, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
महाविकास आघाडीत काम करत असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना कधीच विधायक कामे सुरळीतपणे करू देणार नाहीत, त्यामुळे सेनेने आपल्या समविचारी पक्ष म्हणजे भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केली पाहिजे, असा सल्ला देखिल त्यांनी दिला. भाजप सोबत गेल्या शिवाय शिवसेना स्व.बाळासाहेब ठाकरेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू शकणार नाही, असेही मत त्यांनी पुढे व्यक्त केले.
दोन समविचारी पक्ष सोबत आल्यास याचा फायदा दोन्हीही पक्षांना होणार आहे, महाराष्ट्रात दोन्ही पक्षांनी २.५ – २.५ वर्षे मुख्यमंत्री पद घ्यावे, असेही ते पुढे बोलले. जर दोन्ही पक्ष एकत्र आल्यास दोन्ही कॉंग्रेसला महाराष्ट्रात ५० जागा सुद्धा मिळविता येणार नाहीत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.









