भुजबळ-कांदे यांच्या वादावर खा.संजय राऊत यांनी दोघांना एकमेकांचा मान राखण्याचा सल्ला दिलाय. मुंबई येथे माध्यमांसोबत ते बोलत होते. नांदगाव येथे पूर परिस्थिती आढावा बैठकीत आ.सुहास कांदे आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली होती अन्य आता सुहास कांदे यांनी भुजबळांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सुहास कांदे हे जनतेतून निवडून आलेले आमदार आहेत आणि छगन भुजबळ हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दोन्हीही महाविकास आघाडीचे घटक असून दोघांनी एकमेकांचा मान ठेवलाच पाहिचे, असे राउत यांनी सांगितले.










