loader image
[ays_poll id=7]

राज्यातील शाळांना ४ ऑक्टोबर पासून हिरवा कंदील !

Sep 24, 2021


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात मान्यता दिली आहे, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरु करणेस त्यांनी परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेला प्रस्ताव मंजुर झाला आहे.

  • ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु होणार

  • शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु होणार
  • मंत्रीमंडळ आणि टास्क फोर्स, शिक्षणतज्ज्ञांशी बोलून चर्चा झाली

  • विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर 

  • शाळेतून आल्यावर अंघोळ, युनिफॉर्म धुणे, मास्कचा नियमित वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन याबाबत आवश्यक

  • शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी असणार नाही

  • शाळांमध्ये उपस्थितीची सक्ती नाही, उपस्थितीसाठी पालकांची संमती असणं गरजेचं आहे

  • सध्या निवासी शाळांसंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही

  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याबाबत प्राधान्य आहे


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.