कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे येत्या 7 ऑक्टोबर पासून खुली करण्यात येणार आहेत. याबाबत शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करून हि माहिती दिली आहे.
कोरोना नियमांचे सर्व प्रकारचे निकष पाळून घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे व प्रार्थना स्थळे खुली करण्यात यावीत, अस यात उल्लेख करण्यात आला आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस आहे. या निर्णयाचे राज्यातील सर्व भाविकांनि स्वागत केले आहे.












