loader image
[ays_poll id=7]

गुलाब चक्रीवादळ – दोन दिवस महाराष्ट्रात अलर्ट !

Sep 27, 2021


पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ‘गुलाब’ नावाच्या चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा ओडिशा आणि आंध्रप्रदेश या राज्यांना बसत आहे. आंध्रप्रदेशमध्ये या चक्रीवादळामुळे 3 मच्छिमारांचा मृत्यू झाला. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये 27 आणि 28 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, धुळे, जळगाव, नाशिक, यासह बर्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे रेंड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचसोबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.या चक्रीवादळामुळे समुद्र खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.