loader image
[ays_poll id=7]

महाविकास आघाडीच्या मूळ संकल्पनेला धरूनच स्थानिक पातळीवर आघाड्या !

Sep 30, 2021


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी असणार का? या प्रश्नावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी मतं मांडली जात आहेत. नाना पटोले, संजय राऊत यांनी अनेकदा स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी कायम राहावी अशीच आमची भूमिका असल्याचे मत व्यक्त केले आहे, आज ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारने मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी लोकशाही पद्धातीने विरोध करण्याची भूमिका घेतली. मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा महाविकास आघाडी सरकारनं निर्णय घेतला आहे. तसा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा अध्यादेश राज्यपाल महोदयांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग किती सदस्यांचे असावेत, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी मतं मांडली. त्यावर चर्चा होऊन सरकारचा निर्णय झालाय, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ते अहमदनगरला पत्रकारांशी बोलत होतेय. तसेच स्थानिक पातळीवर आघाड्यांचे योग्य ते निर्णय घेऊ. असे निर्णय तेथील परिस्थितीवर अवलंबून असतील. मात्र, ते करतानाही महाविकास आघाडीच्या मूळ संकल्पनेला धरूनच होतील, असं पाहिलं जाईल. महाविकास आघाडी कायम राहावी, अशीच आमची भूमिका आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.