loader image
[ays_poll id=7]

३० वर्षे सत्ता असूनही मुंबईत मराठी परकीच – आमदार अमित साटम!

Oct 1, 2021


मुंबई कोणाची ? मराठी माणसाची…एकेकाळी स्व.बाळासाहेबांनी मराठी मुंबईची केलेली ओळख…आणि मुंबई कायम राजकीय पटलावर चर्चेत राहिलेले विषय. सध्या मुंबई विविध प्रकरण गाजत असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला धारेवर धरले आहे. गुरुवारी भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्र लिहल्यानंतर आज भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात मुंबईत मराठी भाषेवरून मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीकाही केली आहे.

मुंबईत ३० वर्षे शिवसेनेची सत्ता असून देखील मुंबईत मराठी भाषेची अवस्था अतिशय बिकट असल्याचे साटम यांनी म्हटले आहे. शिवसेनेकडून मराठी भाषेच्या विस्तारासाठी प्रयत्न होत नसल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साटम यांनी पत्र पाठवले असून त्यामध्ये त्यांनी मराठी भाषा व मराठी शालांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
 
मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला, तशीच अवस्था मराठी शाळांची आणि भाषेची झाली आहे. सण 2010-11 मध्ये मराठी शाळांची संख्या ४१३ होती आता सन २०२०-२०२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० इतकी राहिल्याचे साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.