loader image
[ays_poll id=7]

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन

Oct 3, 2021


 

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक दत्ताराम मारुती उर्फ द. मा. मिरासदार यांचं निधन झालं. मराठी साहित्यात विनोदी लेखन आणि कथाकथनामुळे ते वाचकप्रिय ठरले. द. मा मिरासदारांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं झाला. पत्रकारितेपासून त्यांनी साहित्यसेवेस सुरुवात केली.

पुण्यात काही काळ पत्रकारिता केल्यानंतरते अध्यापन क्षेत्राकडे वळले. 1961 ते 1987 या काळात औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालय आणि पुण्यातील गरवारे महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलं. 1950 मध्ये ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या ‘रानमाणूस’ या पहिल्याच कथेपासून त्यांच्या लेखन कारकीर्दीला सुरुवात झाली.

द. मा. मिरासदारांच्या कथांमध्ये ग्रामीण भागाचं कथानक असे. कथांमधील पात्रांना ते अत्यंत विनोदी पद्धतीनं मांडत. तितकचं तीव्रतेनं ते त्या पात्रांना कथाकथनामधून प्रेक्षकांसमोर सादर करत. विनोदी लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या मिरासदारांनी स्पर्श, विरंगुळा आणि कोणे एके काळी यांसारख्या गंभीर कथाही लिहिल्या.

1998 साली परळी-वैजनाथ इथं आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. मिरासदारांनी संवादलेखन केलेल्या ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन सिनेमांना अनेक पारितोषिके मिळाली. तसंच, महाराष्ट्र राज्याचा विंदा जीवनगौरव पुरस्कार (2015) मिळाला. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कारानेही 2014 साली त्यांना गौरवण्यात आले होते.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून मिरासदारांना आदरांजली वाहिली.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – नेपाळ मध्ये काल दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशाने काढलेला व्हिडिओ

बघा व्हिडिओ – नेपाळ मध्ये काल दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशाने काढलेला व्हिडिओ

काल नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.आता त्याच...

read more
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी उच्च शिक्षित, अभ्यासू, युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड ;पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परिषदेस मार्गदर्शन

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी उच्च शिक्षित, अभ्यासू, युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड ;पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परिषदेस मार्गदर्शन

जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषद...

read more
२७ नद्या,५० हून अधिक पर्यटन स्थळे, ४००० किलोमिटर आणि ५० हून जास्त दिवसाचा कालावधी – १३ जानेवारीला लक्झरी रिवर क्रुझ “गंगा विलास” ला हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी

२७ नद्या,५० हून अधिक पर्यटन स्थळे, ४००० किलोमिटर आणि ५० हून जास्त दिवसाचा कालावधी – १३ जानेवारीला लक्झरी रिवर क्रुझ “गंगा विलास” ला हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी

जगातील सर्वात लांब लक्झरी रिव्हर क्रूझ 'गंगा विलास' ला १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

read more
मध्यप्रदेशात धुक्यामुळे विमान धडकले मंदिराच्या घुमटाला; पायलटचा मृत्यमुखी तर एक गंभीर जखमी

मध्यप्रदेशात धुक्यामुळे विमान धडकले मंदिराच्या घुमटाला; पायलटचा मृत्यमुखी तर एक गंभीर जखमी

मध्य प्रदेशातील रीवा येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे घटना घडली असून...

read more
.