loader image
[ays_poll id=7]

काँग्रेसला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीच्या ताकदीची गरज – नाना पटोले

Oct 5, 2021


‘काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून देशाची लोकशाही व संविधान हे काँग्रेसच वाचवू शकते. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष संघटना बळकट झाली पाहिजे. राज्यात काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे, यासाठी एनएसयुआयच्या (National Students Union Of India) युवाशक्तीने पूर्ण ताकदीने काम करुन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यात योगदान दिले पाहिजे’, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला नाना पटोले मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, तरुण हे देशाचे भविष्य आहेत. आपला देश हा तरुणांची जास्त संख्या असलेला देश असून देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाची उद्याची ताकद आहात. सामान्य माणसातून नेतृत्व उदयाला आले पाहिजे, यासाठी एनएसयुआयनेही तालुका पातळीपर्यंत जाऊन विस्तार केला पाहिजे, जनसंपर्क वाढवला पाहिजे, एनएसयुआयच्याही बुथ कमिट्या बनवल्या पाहिजेत. तुमच्यातून पक्षाचे नेतृत्व पुढे आले पाहिजे त्यासाठी ताकदीने कामाला लागा. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख व एनएसयुआयचे पदाधिकारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

ई डी चे अधिकारी असल्याचे सांगून मुंबईतील झवेरी बाजारातील व्यापाऱ्याची पावणे दोन कोटींची लूट

ई डी चे अधिकारी असल्याचे सांगून मुंबईतील झवेरी बाजारातील व्यापाऱ्याची पावणे दोन कोटींची लूट

मुंबईच्या झवेरी बाजारात ई डी चे अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापाऱ्याला तब्बल पावणे दोन कोटी...

read more
बघा व्हिडिओ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचे  विधानभवनात समारंभपूर्वक अनावरण

बघा व्हिडिओ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचे विधानभवनात समारंभपूर्वक अनावरण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात...

read more
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या प्रयत्नातुन अखेर राज्यातील ५९७ परिचारिकांच्या पदाला मंजुरी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या प्रयत्नातुन अखेर राज्यातील ५९७ परिचारिकांच्या पदाला मंजुरी

केंद्र शासनाने २०२२-२३ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर न केलेल्या राज्यातील ५९७...

read more
सिन्नर जवळ झालेल्या बस अपघातातील जखमी रुग्णांशी आणि रुग्णालय प्रशासनाशी मुख्यमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद

सिन्नर जवळ झालेल्या बस अपघातातील जखमी रुग्णांशी आणि रुग्णालय प्रशासनाशी मुख्यमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद

नाशिक-शिर्डी महामार्गावरील वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातातील जखमी रुग्णांवर...

read more
.