loader image
[ays_poll id=7]

धम्म,श्रामनेर शिबरातून मानवी मन मेंदू चिक्तीत्सक व उदबोधित होतो – नामदेव पगारे

Oct 5, 2021


 

येवला : तथागत बुद्धाने जगाला जीवनाचा सम्यक मार्ग दिला असून सत्य,शांती,मानवता,अहिंसा,शील,प्रज्ञा,करुणा, दया,क्षमा या मूल्यांच्या सोबत समता,स्वातंत्र्य, न्याय तत्व सांगून आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकाराचा अडीज हजार वर्षाहून अधिक काळ आधी दिलेला धम्म आजच्या आधुनिक युगात हि काळ सुसंगत आहे.मानवी दुःखाच्या मुळाशी जाऊन बुद्ध धम्म माणसास जीवनाचा आदर्श असा सम्यक जीवन मार्ग देतो तेच धम्म शिक्षण भारतीय बौद्ध महासभा जनतेस देण्याचा गेली साठ-सत्तर वर्ष प्रयत्न करत असून धम्म,श्रामनेर शिबरातून मानवी मन मेंदू चिक्तीत्सक व उदबोधित होतो असे मत नामदेव पगारे यांनी धर्मांतर घोषणेचा ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा,मुक्तीभूमी प्रतिष्ठान येवला आयोजित श्रामनेर शिबिराचे उदघाटन करते वेळी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवला तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव हे होते..भन्ते दीपंकर (चैत्यभूमी) यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीभूमी येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिरास येथे प्रारंभ झाला आहे.
श्रामनेर शिबीरातील धम्म श्रामनेर होणे हा नवा जन्मच आहे असे मत भारतीय बौद्ध महासभेचे पूर्व जिल्हा अध्यक्ष गौरव पवार यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षक उत्तम प्रधान (इंदोर,मध्यप्रदेश),राजू जगताप (जिल्हा सरचिटणीस),गौरव पवार(जिल्हा अध्यक्ष पूर्व जिल्हा),सतिष गांगुर्डे, विजय गांगुर्डे,मनोज गाढे,रत्नाकर साळवे,कृष्णाजी सोनवणे,अरुण जाधव,वाल्मिकी कापडे,भाऊसाहेब जाधव,संजय पगारे,मुक्ती महोत्सव समितीचे प्रवर्तक-निमंत्रक प्रा.शरद शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक ४ ते १३ ऑक्टोबर २०२१ दरम्यान दहा दिवस चालणाऱ्या ह्या शिबिराच्या माध्यमातून बुद्ध धम्मचा इतिहास,वर्तमान,भविष्यकाळ या बद्दल नामवंत मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमात चे प्रास्ताविक राजू जगताप,सूत्र संचालन प्रकाश जगताप,आभार तालुका सचिव दीपक गरुड यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव,भाऊसाहेब झालटे,भगवान साबळे,बाबुराव पगारे,रामा केदारे,रवी सोनवणे,बाळासाहेब निकम,रामा कोळगे,रघुनाथ पगारे,सचिन पगारे,वसंत घोडेराव,सुभाष निकम,रामदास निकम,पोपट खंडांगळे प्रयत्नशील आहेत.


अजून बातम्या वाचा..

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांना महानुभाव पंथाच्या वतीने”कर्तव्य परायण समाजविभूषण पुरस्कार” जाहीर

आमदार सुहास आण्णा कांदे यांना महानुभाव पंथाच्या वतीने”कर्तव्य परायण समाजविभूषण पुरस्कार” जाहीर

वितरण सोहळा होणार २३ जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा हिसवळ खुर्द येथील दत्त मंदिर आश्रमात सुरू...

read more
जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

उमराणे:- जि.प. विद्यानिकेतन, देवळा येथे झालेल्या नमो चषक 2024 क्रीडा चषक अंतर्गत देवळा...

read more
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार यांच्या हस्ते नांदगाव येथे २० खाटांचे फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन संपन्न

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार यांच्या हस्ते नांदगाव येथे २० खाटांचे फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन संपन्न

नांदगाव येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांच्या हस्ते नांदगाव ग्रामीण रुग्णालय...

read more
तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

  सौ.अंजुमताई कांदे यांची "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानांतर्गत जि.प.साकोरा शाळेस...

read more
.