loader image
[ays_poll id=7]

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

Oct 7, 2021


अंकाई ता येवला येथील अंकाई ते भगतवाडी हा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता.त्यामुळे भगतवाडी येथे राहणारे ५० ते ६० कुटुंबाचा गावाशी संपर्कच तुटला होता,तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य श्री अलकेश कासलीवाल यांच्याशी संपर्क साधून व्यथा सांगीतली,त्यांना शेतीमाल वाहतूक करणे मजूर ने आण करणे ,दुग्धव्यवसाय सगळंच ठप्प झालं होतं,
सदर रस्त्यावर खर्च करणे ग्रामपंचायत ला शक्य नव्हतं,,जिल्हा परिषद तातडीने काम करणार नाही म्हणून अंकाईचे सरपंच सौ नागिना कासलीवाल, उपसरपंच शिवम अहिरे,सदस्य डॉ प्रितम वैद्य,अलकेश कासलीवाल,सागर सोनवणे व संतोष टिटवे यांनी स्वखर्चाने जेसिबी दिला व तेथील ग्रामस्थ दत्तू सोनवणे,भगवान जाधव,विलास जाधव,बाळू सोनवणे,पारुबा राऊत,सागर देवकर,बाळू जाधव,नंदू जाधव,नितीन देवकर,रवींद्र जाधव,आदींनी आपला ट्रॅक्टर देऊन शाम व्यापरे, किरण बडे, मारुती वैद्य,भगवान जाधव,किरण देवकर,अण्णा जाधव,शांताराम वैद्य,सचिन जाधव,शंकर चव्हाण व सर्व तरुणांनी मिळून रस्त्याचे काम पूर्ण करून प्रशासनाचे लाखो रुपये वाचवले व स्वतःच्या समस्या वर स्वतःच मार्ग काढत सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे,येवला तहसीलदार प्रमोदजी हिले,भुजबळ साहेबांचे स्वीय सहायक लोखंडे साहेब,बीडीओ उन्मेष देशमुख,सभापती प्रविणजी गायकवाड आदींनी सरपंच सदस्य तसेच ग्रामस्थांचे कौतुक करत अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

भारतीय रेल्वेच्या 85 हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण...

read more
भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

दिल्ली ता. 13 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची...

read more
नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव : मारुती जगधने         २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली...

read more
.