कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाबाबत आज पालक मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली आहे .नासिक ला लागुनच असलेल्या नगर जिल्ह्यातील जवळपास ६९ गावांमध्ये लॉकडाऊन लागू झाला आहे .या संदर्भात नासिक आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .नासिक जिल्ह्यातील गावांमध्ये सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले .या आधारानुसारच गरज पडल्यास सिन्नर,येवला आणि निफाड या तालुक्यांत निर्बंध कडक करण्यात येतील असा इशाराही बैठकीत देण्यात आला तसेच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली .
मनमाड ता. २७ : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.
[contact-field...











