loader image
[ays_poll id=7]

मंत्र्यांनी केवळ खुर्च्यांवर बसू नये, प्रतिहल्ले करावेत – खा.संजय राऊत

Oct 18, 2021


‘सरकारवर होणाऱ्या टीकेला केवळ शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे किंवा संजय राऊत यांनीच उत्तर द्यायचं का? सत्तेत बसलेल्या व सत्ता भोगणाऱ्या सर्वांची ती जबाबदारी आहे. टीकेला रोखण्याची जबाबदारी सरकारमधील सर्व मंत्र्यांची आहे. त्यांनी आता केवळ खुर्च्यांवर बसू नये. प्रतिहल्ले करावेत,’ असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केलं.महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आता शांत राहू नये. हल्ल्या प्रतिहल्ला आणि टोल्याला प्रतिटोला हाणावा. किंबहुना आता सर्व मंत्र्यांना बोलावंच लागेल. तसं झालं तर भाजपवाले आठ दिवसांत पळून जातील,’ असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. ‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर व आघाडीच्या नेत्यांवर खालच्या दर्जाची टीका सुरू आहे. कमी प्रतीचा गांजा विरोधकांनी मारल्यामुळं अशा प्रकारे टीका केली जात आहे,’ असा संताप राऊत यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

  मनमाड:- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक आयोजित नमो चषक 2024 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य...

read more
.