टी२० विश्व चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानमधील उदयपुर जिल्ह्यातील खेलगाव येथील नीरजा मोदी शाळेतील एका महिलेने ” हम जीत गये ” या आशयाचे स्टेटस लावले, त्यानंतर एका पालकाने तिला फोन करून विचारले असता तिने देखील दुजोरा दिला, या कारणावरून तिला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विजयाचे स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भारताच्या दौऱ्यावर चार संघ येणार , सामन्यांचे वेळापत्रक जाहीर
भारताच्या दौऱ्यावर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे क्रिकेट संघ येणार आहेत....





