आपल्या खास शैलीतील शेरोशायरी साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी आज देखील आपल्या खास शैलीत केंद्र सरकारचा समाचार घेतला. ओबीसी आरक्षण हे केवळ केंद्र सरकारच्या आडेमुठ धोरणामुळे गेल असल्याची टीका त्यांनी केली. इथे जनावरांची देखील गणना होते, मग आमची का नाही ? असा सवाल त्यांनी केला. भुजबळ यांनी पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा लावून धरला आहे. पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्यात छगन भुजबळ बोलत होते.
महात्मा फुलेंना भारतरत्न दिलं गेलं पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. परंतु आजकाल कुणालाही भारतरत्न दिले जाते, महात्मा हे पदच मोठं आहे. त्यामुळे तेच राहिलं पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.
मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है,
पर जो हारी हुई बाजी पलट देता है वही असली शेर होता है.
नहीं बदल सकते है हम, औरो के हिसाब से,
एक लिबास हमे भी दिया है, खुदा ने अपने हिसाब से.
सौ दर्द छिपे है सिने मै… सौ दर्द छिपे है सिने मै…
पर कुछ अलग ही मजा है हसकर जिनें मैं.
या प्रकारे शेरोशायरी करीत आनंदी आयुष्य जगण्याचा मंत्र त्यांनी उपस्थिताना दिला.












