loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

सिन्नर जवळ झालेल्या बस अपघातातील जखमी रुग्णांशी आणि रुग्णालय प्रशासनाशी मुख्यमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद

सिन्नर जवळ झालेल्या बस अपघातातील जखमी रुग्णांशी आणि रुग्णालय प्रशासनाशी मुख्यमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद

नाशिक-शिर्डी महामार्गावरील वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातातील जखमी रुग्णांवर...

read more
मनमाड महाविद्यालय विशेष श्रमसंस्कार शिबिरात गांगुर्डे यांचे व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालय विशेष श्रमसंस्कार शिबिरात गांगुर्डे यांचे व्याख्यान संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान तर त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकीच्या तारखा जाहीर

पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान तर त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून कसबापेठ आणि चिंचवड येथे २७...

read more
.