महाराष्ट्र राज्याला खूप मोठा आध्यात्मिक वारसा आहे. ही संस्कृती जोपासनार्या किर्तनकार, प्रवचनकार, लोककलावंत, गोंधळी, गायक, वादक यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने दरमहा मानधन योजना सुरू केली आहे. योजने अंतर्गत दरमहा २२५० रुपये मानधन दिले जाणार आहे. यासाठी अर्जदाराने सर्व कागदपत्रांसह पंचायत समिती येथील पंचायत विभागात अर्ज करावयाचा आहे. यात अर्जदाराचे किमान वय ५० असावे.
* आवश्यक कागदपत्रे :
रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पती
– पत्नी फोटो, ४०००० पेक्षा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदाराचा दाखला, कलेच्या प्रकाराचा पुरावा (सन २०१० पुर्वीच्या कार्यक्रम पत्रिका, प्रमाणपत्र), खासदार, आमदार, जि.प., पं.स.सदस्य, सरपंच, नगरसेवक यांच्या पैकी एकाचे शिफारस पत्र, शासकीय लाभ घेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र. या संपूर्ण कागदपत्रांच्या ३ झेरॉक्स प्रति.
छत्रे हायस्कूल मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी
मनमाड लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त छत्रे विद्यालयाच्या वतीने एकता रॅली सह विविध...











