संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे शनिवार दिनांक ०४ व रविवार दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या के.टी.एच.एम.महाविद्यालाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे फेब्रुवारी २००४ मध्ये सहावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन झाले आहे.
या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी कवी राजू लहिरे व अमोल खरे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तालुक्यातील कवी देखील आपला सहभाग नोंदविणार आहेत. या कवींमध्ये राजू लहिरे, महेंद्र पगारे, अमोल खरे, लक्ष्मण बारहाते, शांताराम वाघ, भाऊसाहेब दोंड, दिपक सोनवणे आदि कवी सहभागी होत आहेत.
तसेच नांदगाव तालुकातुन यशवंत बागुल( विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य), अॅड.विद्या कसबे (नांदगाव), अमिन नबाब शेख (पत्रकार), डॉ.प्रा.जालिंदर इंगळे (साहित्यिक), सतिश केदारे (कामगार नेते), प्रविण बागुल (कामगार नेते), प्रा.ए.टी.कसबे (नांदगाव), डॉ.नितीन जाधव (साहित्यिक), राहुल संसारे (कवी), अर्जुन बागुल( मनमाड), शरद झोबाड (कामगार नेते) आदी उपस्थित राहणार आहेत.
मनमाड शहरात पत्रकार अमिन नवाब शेख व नांदगाव शहरात अॅड.विद्या कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान सन्मानार्थ १५वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नाशिकचा प्रचार व निधी संकलनाचे कार्य सुरु आहे.












