कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या प्रवासासाठी आरक्षित तिकीटाची अट ठेवली आहे मात्र २५ डिसेंबर पासुन मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई पंचवटी एक्सप्रेस या गाडीत प्रवास करण्यासाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. त्यासाठी आता ६ डबे अनारक्षित प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. उदरनिर्वाहासाठी दैनंदिन नाशिक व मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...











