कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता येत्या सोमवार पासून पहिली ते नववीच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या शाळा आता ऑनलाईन सुरु होणार आहेत.परंतु १० वी ते १२ वी चे वर्ग मात्र नियमित सुरु राहणार आहेत.अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकी नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले सर्व सरकारी, निम सरकारी कार्यालय हॉटेल मॉल सह बाजारपेठेत आता नो व्हॅक्सीन नो एंट्री चा नियम कठोर करण्यात आला आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी असेल त्यांनी तो तातडीने घ्यावा. नागरीकांना जर व्हॅक्सीन घेतले नसेल यापुढे नो व्हॅक्सीन नो रेशन असा कटू निर्णय घ्यावा लागेल त्यामुळे नागरीकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
प्रशासन अनेक दिवसापासून नागरीक आणि बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी नियम पाळण्याचे आवाहन करत आहे. परंतु बाजारपेठेत अजूनही मोठ्याप्रमाणावर गर्दी दिसत आहे.नागरीकांनी नियमांचे पालन न केल्यास काही दिवसानंतर बाजारपेठा हि बंद करण्याची वेळ आणू नका असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण
मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...









