गोवा विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून नवीन धोरण राबविण्यात आले आहे. यासाठी दोन इच्छूक उमेदवार असतील तर त्या इच्छुक उमेदवार निवडीसाठी भारतीय जनता पक्षाकडून तेथील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल पदाधिकारी, मंडल समीती, महीला मोर्चा कोर टीम, सर्व आघाडीचे अध्यक्ष व सरचिटणीस या सर्वाना मतदान पेटीत कोणाला उमेदवारी दिली पाहीजे यासाठी मतदान करावे लागले. यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रीया ही लोकशाही पध्दतीने गोवा राज्यामध्ये राबवीली जात आहे. यामध्ये बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांचे महत्व भविष्यात वाढणार असून तिकीट वाटपानंतर होणाऱ्या नाराजी पासूनही नेत्यांचा बचाव होणार असल्याचे मत काही राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.
भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात
मनमाड - मनमाड इंदूर महामार्गावर मालेगावरोडवर चोंढी घाटाजवळ एरंडगाव फाट्याजवळ एका अवघड वळणावर भरधाव...











