loader image

इंदूर – पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी – मागणी !

Jan 20, 2022


चांदवड – मनमाड मार्गाच्या  दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने इंदौर पुणे  महामार्गावर रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या जात असून दोन – दोन तास रांग हटत नसल्याने वाहनधारकांना मोठी डोकेदुखी होत आहे.  कांद्याची आवक वाढल्याने दररोज चारशेहून अधिक ट्रॅक्टर याच मार्गावरील बाजार समितीमध्ये येतात. यामुळे नेहमीच वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

चांदवड ते मनमाड मार्गाच्या दुपदरीकरणाचे  काँक्रीटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. नांदगाव मार्गाचे काम सुरू झाले नसले तरी चांदवड मार्गाचे काम मालेगाव चौफिली पर्यंत आले आहे. सदर काम दुपदरी असले तरी एक पदरी काम होत असून एक बाजूचा मार्ग वाहतूकीसाठी सुरू बठेवण्यात आला असून या कामामुळे चांदवड, नांदगाव आणि पुणे इंदौर राष्ट्रीय महामार्गावर रोजच मोठी वाहतूक कोंडी होत आहे.   इंदौर पुणे महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहतूक होते सतत वर्दळीचा मार्ग असल्याने या वाहतूक कोंडीमुळे  वाहनधारकांना मोठी डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच खड्ड्यामुळे इंदौर पुणे महामार्गाची अक्षरशः  चाळण झाली आहे. त्यातच या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक हैराण झाले आहे. येण्याजण्यास अनेकदा नको वाटतो हा रस्ता इतका त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीत अडकल्या जात असल्याने रुग्णाच्या जीवावर देखील बेतत आहे. त्यातच या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने कांदा विक्रीसाठी आलेल्या  शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची एकच गर्दी होते तर नांदगाव मार्गाने इंधन कंपन्यांचे प्रकल्प असल्याने इंधन टँकरची ये जा असल्याने मोठी गर्दी असते त्यात जड, अवजड वाहनांची वाहतूक आणि मध्येच  घुसणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते या चार ही मार्गावर लांबच लांब वाहनांच्या  रांगा लागल्या जातात. त्यामुळे प्रवाशांचा या वाहतूक कोंडीत खोळंबा होतो. या महामार्गावर आज पर्यंत अनेकांचे अपघात झाले आहे. रोजच होणाऱ्या या वाहतूक कोंडी मुळे शहरातील नागरिकांसह वाहनधारकांना मोठा मनस्थाप सहन करावा लावतो तर कोंडी झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतूक कोंडीवर लवकरच मार्ग शोधला जावा आणि मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होत आहे. 


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.