25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश नव मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मतदानाच्या दिवशी मतदान जास्तीत जास्त संख्येने करणे, लोकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी जागृती निर्माण करणे यासाठी शासनातर्फे विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव रोही येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात अश्विनी वाकचौरे, शितल ठोंबरे, प्रांजली वाकचौरे, रेणुका पाटील, दिपाली गीते, सायना केदारे, निकिता वाघचौरे, अमोल घुमरे, कृष्णा वाकचौरे, शुभम शिंदे, प्रवीण पानगव्हाणे, या विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेतला तर निबंध स्पर्धेत पूजा गीते, रूपाली पाटील, सुजाता पाटील, दिपाली गीते, कांचन व्हलगडे, संकेत थोरात, शुभम गाढे मतदारदीन चित्र स्पर्धेत अश्विनी वाकचौरे, तर अंकिता भोईटे हिने मतदार दिनावर गीत सादर केले. कार्यक्रमाला संत ज्ञानेश्वर विद्यालय तळेगाव रोही चे प्राचार्य आण्णासाहेब आवारे, पर्यवेक्षक दिनकर गाडे, शिवाजी पाटील सर, अनिल सोनवणे सर, प्रवीण मोरे सर, ज्ञानेश्वर हांडगे सर, श्री सूर्यकांत महाले आदी उपस्थित होते
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











