राज्यराणी , तपोवननंतर आता मनमाड- गोदावरी एक्सप्रेस पळविण्याचा घाट घातला जात असल्याने मनमाडकरांनी संताप व्यक्त केला आहे . हिंगोलीच्या नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी सोयीचे व्हावे , यासाठी मनमाड – मुंबई गोदावरी एक्सप्रेस ही हिंगोलीपर्यंत नेण्याची मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे . त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्र लिहिले आहे . सध्या गोदावरी एक्सप्रेस ( गाडी नं .१२११७ आणि १२११८ ) कोरोना संकटामुळे दोन वर्षापासून बंद आहे . ती सुरू करण्याची जोरदार मागणी असूनही रल्वे दुर्लक्ष करीत आहे . मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस मुंबईला जाण्यासाठी मनमाडसह , लासलगाव , निफाड व नाशिक जिल्हा व शहरातील नागरिकांसाठी सोयीची गाडी आहे . गोदावरी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत नेऊ नये , अशी मागणी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवासीधारकांची आहे . गोदावरी एक्सप्रेस ही पंचवटीप्रमाणेच मनमाडसह जिल्ह्यातील नागरिकांची सोयीची व आवडीची आहे . राज्यराणी एक्सप्रेस मनमाड – मुंबई अशी होती ती जालन्यापर्यंत नेण्यात आली आता जर गोदावरी एक्सप्रेस पळविण्याचा प्रयत्न केला तर आरपीआय ( आठवले ) उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेईल , असा इशारा रिपाइंचे नगरसेवक तथा जिल्हाकार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांनी दिला आहे . सदर गाडी ही मनमाड स्थानकातून लवकरात लवकर सूरू करावी , अशी मागणी केली आहे .
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











