loader image
[ays_poll id=7]

गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू करावी : रिपाईची मागणी

Jan 26, 2022


राज्यराणी , तपोवननंतर आता मनमाड- गोदावरी एक्सप्रेस पळविण्याचा घाट घातला जात असल्याने मनमाडकरांनी संताप व्यक्त केला आहे . हिंगोलीच्या नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी सोयीचे व्हावे , यासाठी मनमाड – मुंबई गोदावरी एक्सप्रेस ही हिंगोलीपर्यंत नेण्याची मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे . त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्र लिहिले आहे . सध्या गोदावरी एक्सप्रेस ( गाडी नं .१२११७ आणि १२११८ ) कोरोना संकटामुळे दोन वर्षापासून बंद आहे . ती सुरू करण्याची जोरदार मागणी असूनही रल्वे दुर्लक्ष करीत आहे . मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस मुंबईला जाण्यासाठी मनमाडसह , लासलगाव , निफाड व नाशिक जिल्हा व शहरातील नागरिकांसाठी सोयीची गाडी आहे . गोदावरी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत नेऊ नये , अशी मागणी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवासीधारकांची आहे . गोदावरी एक्सप्रेस ही पंचवटीप्रमाणेच मनमाडसह जिल्ह्यातील नागरिकांची सोयीची व आवडीची आहे . राज्यराणी एक्सप्रेस मनमाड – मुंबई अशी होती ती जालन्यापर्यंत नेण्यात आली आता जर गोदावरी एक्सप्रेस पळविण्याचा प्रयत्न केला तर आरपीआय ( आठवले ) उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेईल , असा इशारा रिपाइंचे नगरसेवक तथा जिल्हाकार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांनी दिला आहे . सदर गाडी ही मनमाड स्थानकातून लवकरात लवकर सूरू करावी , अशी मागणी केली आहे .


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.