एच.एच. जे. बी. तंत्रनिकेतन, चांदवड मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा अंतर्गत, विद्यार्थ्यांकरिता “कवितेच्या गावा जावे” हा कार्यक्रम 28 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मनमाड येथील जेष्ठ कवी लेखक व पत्रकार संदीप देशपांडे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशपांडे सरांनी वेगवेगळ्या धाटणीच्या कविता ऐकवल्या तसेच मराठी भाषेचा वापर, संवर्धन, त्याचे महत्त्वही पटवून दिले.
कार्यक्रमाचे आयोजन अधिव्याख्याता सौ. मेघना वाघ यांनी केले, तर मनोगत व्यक्त करताना विभाग प्रमुख डी.व्ही. लोहार सरांनी कवितेचे जीवनातील स्थान किती महत्त्वाचे आहे ते सांगितले. अधिव्याख्याता गणेश पगार यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.विशाल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजीत सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक अरविंद भन्साळी, सह मानद सचिव झुंबरलाल भंडारी व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य राजेद्र बंब यांनी या आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.












