loader image
[ays_poll id=7]

अंडरपास भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी : नामदार भुजबळांची मागणी

Feb 14, 2022


येवला मतदारसंघ कार्यक्षेत्रात येणाऱ्या मध्य रेल्वेच्या मनमाड – दौंड व मनमाड – हैद्राबाद रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गात पाणी निचराची व्यवस्था करावी अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील पिंपळगाव जलाल व धामोड आणि नगरसुल येथे रेल्वे फाटक होते. रेल्वे प्रशासन ने येथे फाटक काढून अंडरपास मार्ग तयार केले मात्र हे अंडरपास तयार करताना रेल्वे च्या तांत्रिक विभागाने त्यांची व्यवहार्यता न पाहता चुकीचा पद्धतीने बांधकाम केल्याने भुयारी मार्गातून पाणी जाण्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात या मार्गामध्ये तुडुंब पाणी साचलेले असते व दळणवळण बंद होऊन वाहनधारकांची गैरसोय होते व जनतेला त्रास सहन करावा लागतो.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.