लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात मनमाड ची कन्या आरती दाभाडे (सोनवणे) हीचा वैजापूर येथे सासरच्यांकडे संशयास्पद मृत्यूप्रकरणी व मृत आरतीस न्याय मिळावा तसेच या घटनेतील जबाबदार दोषींवर कठोर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी मनमाड शहरात सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मुक्तांगण जिमखाना पासून निघालेल्या या मोर्चामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते,संघटना,सराफ सुवर्णकार बांधव,व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांसह मोठ्या संख्येने मनमाडकर सहभागी झाले होते. एकात्मता चौकात मोर्चाच्या समारोप प्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी गृह राज्यमंत्री शंभू राजे यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करून मनमाड करांच्या तीव्र भावनांची दखल घ्यावी व तत्काळ दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.या प्रसंगी नगरसेवक प्रवीण नाईक, गटनेते गणेश धात्रक, राजाभाऊ पगारे राजाभाऊ आहिरे,नितीन पांडे,संतोष बळीद,राजाभाऊ पारिक, सुरेश लोढा,सुनील पाटील यांसह सर्व पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...











