मौजे कातरवाडी वडगाव पंगु वनविभाग हद्दीत आज सायंकाळी ५:३० च्या सुमारास परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाला….. कातरवाडी येथील शेतकरी संदीप झाडे यांच्या शेतालगत ही घटना घडली… शेतात काम करत असताना त्यांच्या ही घटना लक्षात आली… त्यांनी तात्काळ भागवत झाल्टे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली…. भागवत झाल्टे यांनी वनमजूर भाऊसाहेब झाल्टे,यांच्यासह ग्रामस्थ संदीप झाल्टे,सुभाष संसारे,यांना सोबत घेत घटना स्थळी धाव घेतली…परंतु भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाला होता. निसर्गप्रेमी नागरिकांकडून सदर घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.काही महिन्यांपूर्वी सुध्दा या परिसरातील बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्यात परिसरातील बालकांना गंभीर दुखापत झाली होती. भटक्या बेवारस कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित
मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...