सकाळी दार उघडल्यावर चिवचिवणारी चिऊताई आता शहरी भागातून जवळपास हद्दपार होऊ लागली आहे. जगभरातील वाढते औदयोगिकरण,वाढते प्रदूषण,शहरीकरण यामुळे अंगणातील चिमणी दिसेनाशी झाली आहे. तिचा चिवचिवाट कमी झाल्याचे जाणवतंय.
त्यामुळे चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी तिचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी आपण सर्वमिळून घेऊया,,,!
ऊन खूप वाढलंय, अंगणात चिऊताई साठी दाणा-पाणी ठेवूया,,,! नाहीतर आपल्या पुढील पिढीला गुगल वर सर्च करून चिमण्या दाखवाव्या लागतील.
चिमणी दिनाच्या दिवशी संकल्प करूया तिच्या रक्षणाचा व संवर्धनाचा !
– फलक रेखाटन – देव हिरे.(कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’,संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...











