मनमाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.समीरसिंह साळवे यांना त्यांनी गडचिरोली येथे कार्यरत असताना केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती भारत सरकार यांचेकडून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभ हस्ते ” वीरता पुरस्कार ” (पोलीस पदक) समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल उपविभागीय अधिकारी मा. समीरसिंह साळवे यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा













