संपूर्ण देशभरात २१ मार्च ते ०४ एप्रिल २०२२ या कालावधीत राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा केला जातो आहे..एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अंतर्गत नाशिक,मनमाड, भगूर, येवला या नागरी भागातील १०० अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात व परिसरातही अंगणवाडी सेविका सोशल मिडियाद्वारे जनजागृती करत आहेत. तसेच प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या वेळापत्रकानुसार उपक्रमही घेत आहेत. प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी स्वतः मेहनत घेवून जनजागृतीसाठी व्हिडिओ तयार केलेले आहेत. एक टिम तयार करुन या सेविकांनी पोषण पंधरवडाच्या विविध थीमवर तयार केलेले व्हिडिओ हे पालक,परिसरातील नागरिक व इतरही लोकांना जनआंदोलन उभारले जावे या हेतूने व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम, शेअर चॕट, ट्विटर इ. चा वापर करुन पाठविले जात आहेत.या जनजागृतीमुळे पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.तसेच या प्रयत्नांमुळे सक्षम महिला, सुदृढ बालक व सुपोषित महाराष्ट्र घडेल.अशी माहिती मुख्यसेविका सुज्ञा खरे यांनी दिली.
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











