भारतीय अन्न महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात भारतीय अन्न महामंडळ अर्थात भारतीय खाद्य निगम तर्फे आयोजित भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमृतमहोत्सव अंतर्गत अन्न योजना आणि सार्वजनिक वितरण कार्यक्रम भारतीय खाद्य निगम च्या क्रांती मैदान येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सुहास कांदे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.या वेळी भारत सरकारच्या खाद्य विभागाच्या विविध योजना जसे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना , अंत्योदय योजना , अन्नपूर्णा योजना , संपूर्ण ग्रामीण योजना , मध्यान्न भोजन योजना , फॉरटीफाईड राईस यासारख्या अनेक योजनांची चित्रफितीतून सविस्तर माहिती देण्यात आली. व्यासपीठावर नायब तहसीलदार प्रमोद मोरे, माजी नगरसेवक साईनाथ गिडगे, शिवसेना शहरध्यक्ष मयूर बोरसे, माजी नगरध्यक्ष राजेंद्र आहिरे, भारतीय खाद्य निगम मंडळ कार्यालय मनमाडचे मंडळ प्रबंधक बी.एम.राऊत होते.कार्यरत अधिकारी कर्मचारीवृंद कामगार बंधु भगिनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना लाभार्थी , मनमाडवासीयांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सुहास कांदे यांनी फॉरटीफाईड राईसचे महत्त्व सांगितले. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना द्वारे भारतीय खाद्य निगमचे देशभरात झालेले खाद्यान्न वितरण या संदर्भात संबोधित केले . उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितित भारतीय खाद्य निगम मनमाड परिसर मधे राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . याप्रसंगी अनेक लाभार्थ्यांना पेढे भरवून तसेच पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमांशू सिघल आणि वैष्णवी लकडे यांनी केले .
कोरोना काळात भारतीय खाद्य निगम द्वारे झालेले खाद्यान्न वितरण आणि कार्यप्रणालीवर मंडळ प्रबंधक बी.एम.राऊत यांनी वक्तव्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी आभारव्यक्त के.एल.वाघ यानी केले.कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी भा.खा.नि. मनमाडचे अनंता महाजन , तुषार गुंजाळ , प्रदीप दातिर , कैलाश शर्मा , प्रदिप मारकंडे , पूजा सिंह , प्रशांत जोशी, तुषार गुंजाळ, विक्रम शाहू आदिनी केले.












