महाआवासअभियान २०२०-२१ च्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली. प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीण मध्ये गोंदिया तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा अव्वल ठरला. या अभियानात ५ लाखापेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली.
प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम, धुळे जिल्हा दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट ठरला. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम, रत्नागिरी जिल्हा व्दितीय आणि वर्धा जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
















