मनमाड (योगेश म्हस्के): सध्या उन्हाळा ऋतु सुरू असुन वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत आहे , या उष्णतेचा परिणाम हा फक्त माणसांनाच नव्हे तर मुक्या प्राण्यांना देखील खुप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
गेल्या काही वर्षांपासुन निसर्गाच्या झालेल्या बदलांमुळे सर्वच ऋतूंवर याचे परिणाम होत आहे , सध्या उन्हाळा ऋतु सुरू असुन प्रचंड उष्णता ही वातावरणात जाणवत आहे . सध्या अनेक शहरातील तापमान हे 40 ते 45 अंशापर्यंत जात असुन याचे परिणाम हे मनुष्यांप्रमाणेच मुक्या प्राण्यांवर देखील जाणवत आहे. असेच एका मनमाड शहरातील भटक्या बैलाचे छायावृत्त आपण बघत आहोत , भर दुपारच्या उन्हामध्ये हा मुकाप्राणी दुपारी उन्हामुळे एका बंद दुकानासमोर लावलेल्या छत्रीच्या सावलीचा आसरा घेताना आपण पाहत आहोत . अशाच प्रमाणे मोठया प्रमाणात ऊन्हापासुन बचाव करण्यासाठी मुक्या प्राण्यांचा प्रयत्न चालु असतो , आपण प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजुन उन्हाळ्यात या आपल्या मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करायला हवा....













