मोरझर – गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार संकल्पना .
नांदगावच्या दक्षिण भागातील मोरझर येथे युवा मित्र संस्थेने जलसमृद्धी तून विकासाकडे या उपक्रमांतर्गत जलसाठा समृद्ध करण्यासाठी गावातील लेंडी नदी व सिमेंट बंधारे पाझर तलावातील गाळ काढून खोली वाढवण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
मोरझर गाव दुष्काळाच्या खाईतुन मुक्त करण्यासाठी गावच्या सरपंच सौ.लिना समाधान पाटील यांनी सातत्याने पत्रव्यवहार करुण युवामित्र संस्थेकडे पाठपुरावा केला.त्यांच्या पाठपुराव्याची योग्य दखल घेतली आणी न्याय दिला .
टाटा ट्रस्ट व गॅलक्सी या दोन संस्थांनी यासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आहे.
युवा मित्राच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरझर येथील गावाजवळील नदीच्या खोली करणाच्या कामाचा प्रारंभ झाला. वर्षनुवर्ष साचत असलेल्या गाळामुळे गावातील पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी तलावाचा उपयोग होत नव्हता .सरपंच व स्थानिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन युवा मित्रची जलसमृद्धीतुन विकासाकडे ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला.
सदर कामाचे उदघाटन सरपंच सौ.लिना पाटील यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मोरेश्वर गाळ उपसा समितीचे अध्यक्ष सचिन चोळके,सुर्यभान चोळके,कैलास चोळके,वसंत चोळके,श्रावण चोळके,वाल्मिक गायके, महेंद्र चोळके,योगेश निकम,सतिष चोळके,अंबादास सोनवणे ,भाऊसाहेब चोळके,प्रकाश चोळके,देविदास पाटील, रामनाथ चोळके,पंडीत चोळके,संजय चोळके,दत्तात्रय चोळके,विनायक चोळके,अशोक चोळके,नारायण निकम,गणपत पावशे,हिरामण माळी,संतोष सोनवणे,आदी शेतकरी व युवा मित्रचे पदाधिकारी तुळशीराम घागरे ऋषिकेश डांगे कमलेश काळे यांनी उपस्थित शेतकर्यांना बंधाऱ्यातील गाळ आपल्या शेतात टाकून जमीन सुपीक करून घेण्याचे आव्हान केले. व गाळ वाहून नेण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली .












