मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार मनसे कार्यकर्त्यांवर करत असलेल्या कारवाई बद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले असून सत्ता येत- जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही आणि आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे ही त्यांनी शेवटी पत्रात म्हटले आहे













