युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर करत होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष लढणार असल्याची घोषणा त्यांनी ह्यावेळी केली संभाजीराजेंचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढे काय पाऊल उचलतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते परंतु आता राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. तसेच भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजेंनी स्वराज्य या संघटनेची घोषणा ह्यावेळी केली. सगळ्या मराठा समाजला एका छताखाली आणण्यासाठी ही संघटना स्थापन केली असल्याची खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यातील पहिला निर्णय हा राज्यसभेच्या संदर्भात आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिले असेल तर येत्या जुलैमध्ये ६ जागा रिक्त होणार आहेत. पूर्वीचे समीकरण काय तर ३ जागा भाजप, १ राष्ट्रवादी, १ शिवसेना आणि १ जागा काँग्रेस असे सहा जागांचे समीकरण आहे. परंतु आताचे समीकरण आहे की, २ जागा भाजप, १ राष्ट्रवादी, १ शिवसेना सहाव्या जागेचं संख्याबळ कमी असल्यामुळे कुठलाही एक पक्ष आणि कुठलीही १ आघाडी करु शकत नाही असे संभाजीराजेंनी सांगितले .
सरदार पटेल रोडचे ‘शुक्लकाष्ट’ कधी संपणार?
मनमाड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील मुख्य रस्ता असलेल्या सरदार पटेल या मार्गाची अत्यंत दयनीय...











