महाराष्ट्रातल्या प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नेमक्या कधी होणार याचा फैसला आता सुप्रीम कोर्टात १७ मे रोजी होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने आपली याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन केली असता कोर्टाने त्यावर सुनावणीसाठी १७ मे दुपारी दोन वाजेची वेळ निश्चित केली आहे. महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्टोबरमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का? याचे उत्तर १७ मे रोजी कळणार आहे.
भाजपा मनमाड शहर मंडल 10 व्या आंतर राष्ट्रीय योग दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
मनमाड - मनमाड शहर भाजपा मंडलाचे वतीने 2015 पासून सलग 10 व्या वर्षी शुक्रवार दिनांक 21 जून 2024...











