loader image
[ays_poll id=7]

औरंगाबादची तोफ ठरली ‘भारतातील सर्वात लहान तोफ’.

May 19, 2022



औरंगाबादेतील औद्योगिक व्यवसायात कार्यरत असणारे, विठ्ठल उत्तमराव गोरे यांनी बनवलेल्या भारतातील लहान तोफेची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नुकतीच करण्यात आली. वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील शेतकरी कुटुंबातून आलेले विठ्ठल गोरे यांचा ‘शिव कृष्णा इंडस्ट्रीज’ नावाने मशिनरी बनवण्याचा कारखाना आहे. सोबतच त्यांना ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे बनवण्याचा छंद आहे. या छंदातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तोफांची निर्मिती केलेली आहे. त्यांनी अलिकडेच एक अत्यंत लहान पितळी तोफ बनवली होती. तिची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली असून, तसं सर्टिफिकेट विठ्ठल गोरे यांना नुकतंच प्राप्त झालं. ऐतिहासिक औरंगाबाद शहरात एका सूक्ष्म तोफेची भर टाकून त्यांनी शहराचा मान आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी बनवलेली तोफ ही भारतातील सर्वात लहान तोफ आहे. तीची लांबी 5 मिलीमीटर असून उंची केवळ 2.7 मिलीमीटर आहे. वजन केवळ 140 मिलिग्रॅम आहे. ही तोफ अस्सल तोफेप्रमाणे उडवताही येऊ शकते.
गडकिल्ले भ्रमंतीसोबतच मोडिलिपी, ब्राम्ही लिपी आशा जुन्या लिपींचाही प्रसार करण्यासाठीही विठ्ठल गोरे यांचं मोलाचं योगदान आहे.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.