महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी कमलाकर (आबा)देसले यांचे शुक्रवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने रात्री निधन झाले. सायंकाळी अचानक छातीत दुखु लागल्याने त्यांना सटाणा रोडवरील संकल्प हाँस्पीटल मध्ये अँडमीट करण्यात आले होते.उपचार सुरु असतांनाच त्यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी ११-०० वाजता झोडगे येथे अंत्यसंस्कार होणार आहे. कमलाकर आबा हे जनता विद्यालयात अनेक वर्ष सेवा केली. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना कविता लिखाणाचे मार्गदर्शन काय केले. अहिराणी साहित्यात ही त्यांनी लेखन केले. कविता व गझल आणि ललित लेखनात त्यांचा चांगला हातखंडा होता.त्यांच्या कवितांना ते स्वतः चाल लावत असत.कविता ह्या गेय असल्यामुळे त्या रसिकांच्या मनावर राज्य केले. खलील मोमीन व कमलाकर देसले यांचा पत्रव्यवहार सर्वश्रुत आहे.विविध साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग घेऊन गाजवली. विविध ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भुषविलीत.ते उत्तम सुत्रसंचालन करत असत.तसेच ते धार्मिक वृत्तीचे होते.त्यांनी विविध अभंगाचे निरुपण केले. आईवरची व दिवली या कविता विशेष प्रसिद्ध होत्या.अशा महान साहित्यिकाच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात पोकली निर्माण झाली. आबांना भावपूर्ण श्रध्दांजली
ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा
एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून...











