मनमाड : भारत देशाची मुख्य आणि पवित्र नदी असणारी आणि या नदीला पुरातन काळापासुन दक्षिण गंगा म्हणुन ओळखले जाते अशी ‘गोदावरी’ नदी आहे , सर्व दोषांचे निवारण करणारी भगवान शंकराची मानसकन्या ब्रह्मवाहिनी म्हणून ओळखली जाते. गोदावरी नदी श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते राजमहेंद्री ब्रह्मवाहिनी म्हणून गोदावरी विहारते.
गोदावरीच्या काठी असलेली भूमी व गावे तिच्या पाण्याने पवित्र झालेली आहेत. हिच्या काठावर देव व पितर यांना सद्गती प्राप्त होते.भारत देशात सर्वत्र पूजापाठ करतांना संकल्प उच्चारतांना काल, ग्रह यांच्या उच्चाराबरोबर गोदावरीच्या उत्तरेस अथवा दक्षिणेस किंवा गोदावरीच्या काठी असा उल्लेख केल्याशिवाय देवादिकांना ते स्थान समजत नाही. श्री गणपती व श्री वरुण देवता यांची थोरली बहीण असल्याने हिच्या मार्फत गेल्यास ते लवकर पर्जन्यवृष्टी करतात , असे मानले जाते.
देशभरात जेष्ठ शु. १ ते जेष्ठ शु. १० या कालावधीत ‘श्री गंगा दशहारा’ हा उत्सव साजरा केला जातो. सालाबादप्रमाणे यावर्षी ही श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) मनमाड येथे गेल्या दहा दिवसापासून श्री गंगा गोदावरीच्या पवित्र जलाच्या कलशाची स्थापना व पूजन केले जात होते. ‘श्री गंगा दशहरा’ उत्सवाच्या सांगते निमित्त गावातील रामगुळणा व पांझण नदीच्या काठावर हा कलश मिरवणूकीसहीत नेऊन तेथे यथासांग मानसन्मान सेवेकाऱ्यांद्वारे करण्यात आला तसेच देशात,गावात सुपर्जन्य वृष्टी साठी प्रार्थना करण्यात आली.












