loader image
[ays_poll id=7]

आता मतदार ओळखपत्र देखील आधाकार्डशी लिंक करावे लागणार

Jun 18, 2022


केंद्र सरकारने मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. पॅनकार्डसोबत आधार लिंक करणे अनेक दिवसांपासून सरकार सांगत असून आता मतदार ओळखपत्राशीही आधार लिंक करणं आवश्यक असणार आहे याबाबत सरकारने शुक्रवारी चार अधिसूचना जारी केली असल्याचे कळते.

मतदार यादीशी आधार लिंक करणे, सेवा मतदारांसाठी मतदार यादी लिंग-सुसंगत करणे याशिवाय तरुण मतदारांना वर्षातून एकऐवजी चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय निवडणूक प्रक्रियेतील बोगस मतदानाला आळा बसू शकतो.

देशातील नागरीकांच्या मतदार यादीचा डेटा आधार इकोसिस्टमशी जोडला की, एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे वापरू शकणार नाही. यामुळे एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवण्यापासून रोखले जाईल. मतदार यादीला आधार लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या नाव नोंदणीचे गैरप्रकार रोखता येतील, असे सरकारचे म्हणणे आहे.
18 वर्षे पूर्ण होणारे तरुण मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तात्काळ अर्ज करू शकतात. यापूर्वी वर्षातून एकदाच ही सुविधा मिळायची. आता वर्षातून चार वेळा नाव नोंदणी करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.

सेवा मतदारांचा विचार करून निवडणूक कायद्यात त्यांच्या सोईच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सैनिकांसारखे सेवा मतदार हे निवडणूक काळात दूर अंतरावर असतील किंवा किंवा परदेशात भारतीय मिशनचे सदस्य हे सेवा मतदार म्हणून गणले जाणार आहेत. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे लिंगभाव विषमता काढून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याने “पत्नी” हा शब्द “जोडीदार” या शब्दाने बदलला जाईल ज्यामुळे लिंगभाव विषमता नष्ट होण्याचा प्रयत्न आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.