मनमाड (अजय सोनवणे): मनमाड सह त्याच्या आजूबाजूच्या परिसरात सतत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे,काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्या नंतर आज सकाळ पासून दिवसभर विश्रांती घेतलेल्या वरून राजाने संध्याकाळच्या सुमारास मनमाड लागत असलेल्या कातरवाडी शिवारात संध्याकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली,जोरदार पाऊस झाल्याने कातरवाडी-रापली दरम्यान असलेला पाझर तलाव भरून गेला तर शेतकरी भगवान झालटे यांच्या शेतात पाणी साचले,सध्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मक्याची पेरणी केलीय,मात्र शेतात असेच पाणी तुंबून राहिले आणि पावसाने थोडी उघडीप दिली नाही तर मक्याला येत असलेली कोंब खराब होईल किंवा जी थोडी फार उगवलेली आहे ती खराब होण्याची भीती शेतकरी झालटे यांनी व्यक्त केलीय,असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहरासह पडत असलेल्या जोरदार पावसाने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याबरोबरच आटलेल्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











