गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे राज्यातील दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम यांसारखे सण मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास मर्यादा आल्या होत्या. पण आता हे सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करता येणार आहेत. पण या सणांबाबत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचं पालन मात्र करणं गरजेचे आहे, असे निर्देश मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह इथं या सार्वजनिक उत्सवांसंदर्भात विविध समन्वय समित्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या बैठकीत झालेले निर्णय आणि प्रशासनाला दिलेले निर्देश –
१) उत्सव मार्गांवरील खड्डे दुरुस्तीचे आदेश
२) मंडप, इतर परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, ऑनलाईन परवानग्या. क्लिष्ट अटीशर्ती, शुल्क नसणार.
३) कोविडकाळात आणलेली गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा हटवली.
४) सामाजिक बांधिलकी, नियमांचे पालन करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. नियमांबाबत बागुलबुवा नको.
५) मुंबईतल्या नियमावलींप्रमाणंच राज्यातही नियम असतील.
६) विसर्जन घाट, मिरवणूक मार्गांवरील लाईटच्या व्यवस्था होतील.
७) मूर्तीकारांच्या मागणीनुसार मूर्ती बनवण्यासाठी जागा देण्यात येणार
८) धर्मादाय आयुक्तांकडील नोंदण्या ऑनलाईन होणार
९) ध्वनीप्रदुषणाबाबत दाखल गुन्ह्यांचा तपास करुन किरकोळ गुन्हे हटवणार
१०) हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे पालन करणं आवश्यक












