loader image
[ays_poll id=7]

केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील संभाव्य बदलाबाबत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रसृष्टीला आवाहन

Sep 1, 2022


केंद्र सरकार कामगार कायद्यात बदल करीत आहे.. त्याचा फटका सर्वच क्षेत्रातील कामगारांना जसा बसणार आहे तसाच तो श्रमिक पत्रकारांना देखील बसणार आहे.. कारण सरकार १९५७ चा श्रमिक पत्रकार कायदाच मोडीत काढत आहे..त्यामुळे वेजबोर्ड आणि पेन्शन आणि अन्य काही संरक्षण रद्द होऊन मालकांची मनमानी वाढणार आहे.. त्या संबंधी राज्य सरकारचे १८० पानांचे एक नोटिफिकेशन १८ जुलै रोजी कामगार आयुक्तांनी प्रसिध्द केले आहे..कामगार कायद्यातील बदलाबाबत ४५ दिवसात हरकती आणि आक्षेप मागविण्यात आले आहेत.. ही मुदत उद्या संपणार आहे..
नवीन कायद्याचं जे प्रारूप प्रसिध्द झालं आहे त्यावर हरकती आणि सूचना करण्यासाठी मुदतवाढ मागून घेण्याचा निर्णय बीयुजे, मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ, आदि पत्रकार संघटनांनी घेतला आहे. त्यासाठी बीयुजेचे इंदरकुमार जैन वकिलाशी चर्चा करीत आहेत.. पत्रकार संघटनांनी वेगवेगळ्या हरकती घेतल्या तर त्या कदाचीत परस्पर विरोधी मतं व्यक्त होऊ शकतात .. हे टाळण्यासाठी सर्वमान्य होईल असा हरकती आणि सूचनांचा मसुदा तयार करण्यात येणार आहे.. वकिलांनी तयार केलेला हा हरकतीचा मसुदा कामगार आयुक्तांकडे सादर केला जाईल..
कामगार कायद्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या पोस्ट सध्या सोशल मिडियावर फिरत आहेत.. १८० पानांचं वाचन न करता यातील काही पोस्ट तयार केल्या आहेत.. काहींनी कायदेशीर संरक्षण रददचा अर्थ पत्रकार संरक्षण कायदा रद्द असा घेऊन तश्या पोस्ट व्हायरल केल्या.. तसं नाही.. हा केंद्राचा कायदा असल्याने त्याचा महाराष्ट्र सरकारच्या पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार सन्मान योजना अथवा शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलतींवर काही परिणाम होणार नाही.. उगीच पूर्ण अभ्यास न करता अफवा पसरवू नयेत ही विनंती.. कामगार कायद्यातील संभाव्य बदलानं सर्वच क्षेत्रातील कामगार बाधीत होणार असल्याने त्यातून मोठी अस्वस्थत:निर्माण होऊ नये यासाठी सरकारी पातळीवर गुप्तता पाळली गेली.. त्यामुळे हा विषय माध्यमांना देखील कळला नाही.. मात्र ही गोष्ट संघटना म्हणून जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा आम्ही योग्य ती कारवाई सुरू केली..

श्री एस.एम देशमुख, मुख्य विश्वस्त
श्री किरण नाईक. विश्वस्त


अजून बातम्या वाचा..

हिरेनगर येथील महिलांना भुताळीन समजून मारहाण झाल्याच्या प्रकरणाची चौकशी कारावी अ. नि. स मागणी

हिरेनगर येथील महिलांना भुताळीन समजून मारहाण झाल्याच्या प्रकरणाची चौकशी कारावी अ. नि. स मागणी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील महिलांना भुताळीन ,डाकीन म्हणून हिणावुन...

read more
गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

येवला येथील पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गंभीर लहू सपकाळे वय ३६...

read more
चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या...

read more
मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली

दिनांक: 08/05/2023 . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर सर हे होते....

read more
मनमाड महाविद्यालयात श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांना विनम्र अभिवादन.

मनमाड महाविद्यालयात श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांना विनम्र अभिवादन.

मनमाड ता.८. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए...

read more
.