एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी ) नाशिक -२
आ.फडोळ सर प्रकल्प अधिकारी याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सेविकाताई ,मदतनिसताई यांनी भगुर,नाशिक,येवला,मनमाड येथे आज राष्ट्रीय पोषण अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. पोषण माह(१ ते३० सप्टेंबर )२०२२ सप्टेंबर महिनाभर विविध थीम महिला आणि स्वास्थबालक आणि शिक्षण (पोषणाबरोबर शिक्षणदेखील),लिंग संवेदनशील-जलसंधारण आणि व्यवस्थापन.आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ
याच्या माध्यमातुन जनजागृती केली जाणार आहे.. पोषण अभियानाचे उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कुपोषण निर्मुलनाबाबत,आरोग्य शिक्षणाविषयीचे संदेश लोकांपर्यन्त पोहचवीण्यासाठी एक टिम म्हणुन विविध संदेश लाभार्थी, पालक व जनतेपर्यंत पोहोचवून जनजागृती केली जाणार आहे.. पोषण अभियान हे जनतेचे आंदोलन व्हावे..तसेच ही एक लोक चळवळ व्हावी..हाच प्रयत्न केला जाणार आहे. .मोठ्या मेहनतीने तसेच सकारात्मक विचार करुन लाभार्थी सर्वोच्च हित डोळ्यासमोर ठेवुन ही टिम सज्ज झाली आहे. यावेळीही या टिमने सोशल मिडियाचा तसेच अंगणवाडी स्थरांवर कामकाज केले जात आहे..ह्या पोषण माहमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग घेवुन त्यांच्या पोषणाचे वर्तनात बदल घडवुन सर्व बाबी समजावुन सांगुन चांगल्या पोषणाची सवय लावणे हाच प्रयत्न राहणार आहे. थिमवर काम केले जाणार आहे..या कामी त्यांना सुज्ञा खरे, मयुरी महिरे, पुष्पा वाघ, शितल गायकवाड या मुख्यसेविकांचे मार्गदर्शन लाभत आहे…सही पोषण ..देश रोशन…
सरदार पटेल रोडचे ‘शुक्लकाष्ट’ कधी संपणार?
मनमाड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील मुख्य रस्ता असलेल्या सरदार पटेल या मार्गाची अत्यंत दयनीय...











