loader image
[ays_poll id=7]

सुवर्णकार तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांचा पुढाकार : ना नफा ना तोटा तत्वावर लासलगाव वासीयांसाठी पुरविणार शुद्ध पाणी

Sep 11, 2022


लासलगाव सराफ असोसिएशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांनी लासलगाव शहरातील नागरिकांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर नाममात्र शुल्क आकारून पाण्याच्या एटीएमद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला असून, परिसरातील नागरिकांनी या शुद्ध पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष दिंडोरकर यांनी केले आहे.

लासलगाव शहरात होणारा पाणीपुरवठा तांत्रिक कारणांमुळे उशिराने होत आहे तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नळांद्वारे येणारे पाणी हे अशुद्ध असल्याने साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सुवर्णकार तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांनी लासलगाव शहरातील नागरिकांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर पाण्याच्या एटीएमद्वारे पाच रुपयांत दहा लिटर व दहा रुपयांत वीस लिटर शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा सुरू केला आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सचिन मालपाणी, गोटुशेठ बकरे, दीपक खैरे, संदीप उगले, अजहर पठाण, संजय सोनवणे, संजय खरोटे, मुन्ना भाई, राधेश्याम वर्मा, जगदीश वडनेरे, सन्नी छाबडा, यश पवार, संतोष दिंडोरकर, गणेश दिंडोरकर, श्रीराम दिंडोरकर व परिवार उपस्थित होता.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 14 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील मयुर शिंदे व रजा शेख यांची अर्धशतकीय खेळी युवराज शर्माचे 4 बळी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 14 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील मयुर शिंदे व रजा शेख यांची अर्धशतकीय खेळी युवराज शर्माचे 4 बळी

  गुरुवार 28 डिसेंबर 23 रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट असोसिएशन आयोजीत...

read more
ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

  विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...

read more
.