
मनमाड – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासात माता रमाई यांचा मोलाचा वाटा आहे,बाबासाहेबांचे उच्च शिक्षण व विविध क्षेत्रातील कामागिरी माता रमाईच्या त्याग व बलिदानामुळे शक्य झाली. आजच्या महिलांनी माता रमाईच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करण्याची गरज आहे.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षा ऍड.आम्रपाली निकम यांनी केले. वर्षावास कार्यक्रमानिमित्त ऍड.निकम यांनी बुद्धवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारास भेट देऊन माता रमाईच्या जीवनावर व्याख्यान दिले.बुद्ध विहार विकास समिती अध्यक्ष अरुण अंकुश,सेक्रेटरी अशोक गरुड ,केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे ,बौद्धाचार्य मच्छिन्द्र भोसले, साहेबराव आहिरे,निलेश निकम ,तसेच महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समिती अध्यक्ष शालुबाई भोसले, उषाबाई केदारे,चंद्रकला एळीजे ,चित्राबाई अंकुश, संजीवनी गरुड, वंदना अंकुश,चंद्रकला दि.एळीजे, संगीता जाधव, ताईबाई केदारे , सुमनबाई कसबे ,सुमनबाई गरुड, अलकाबाई केदारे,लक्ष्मीबाई वाघ, भारती केदारे,मंदाबाई जाधव ,अनिताबाई केदारे,निर्मलाबाई अंकुश,कमळाबाई एळीजे,कमिनीबाई केदारे, सुशीलाबाई हेगडमल,पदमाबाई शेजवळ,इंदूबाई एळीजे, अंजनाबाई वाघ,वैशाली आहिरे, मायाबाई जाधव, प्रमिलाबाई जाधव ,निलम जाधव ,निता एळीजे पायल केदारे, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आम्रपाली वाघ यांनी आभार प्रदर्शन केले ..











